HW News Marathi
Covid-19

केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे | राहुल गांधी

मुंबई | “केंद्राने देशातील सर्व राज्यांना आवश्यक ती सर्व मदत द्यायला हवी. राज्य कोरोनाशी सामना करत आहेत त्यामुळे त्यांना आवश्यक ती सर्व मदत पोहोचवणे, योग्य व्यवस्थापन करणे हे केंद्राचे काम आहे. महाराष्ट्र हे देशातील अतिशय महत्त्वाचे आणि अद्वितीय राज्य आहे. महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला पैसे द्यायलाच हवेत”, असा सल्ला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (१६ मे) केंद्राला दिला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दुष्टीकडे अनेक स्तरांवर निर्णय आणि अंमलबजावणीच्या बाबतीत काहीसा घोळ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, राहुल गांधींनी केंद्राला सल्ला दिला आहे.

“राज्य सरकार सध्या कोरोनाशी लढा देत आहेत. या परिस्थितीत राज्य सरकारचे काम ऑपरेट करण्याचे आहे तर केंद्राचे काम हे सर्व व्यवस्थित मॅनेज करण्याचे आहे. त्यामुळे केंद्राकडून देशातील प्रत्येक राज्याला आवश्यक ती सर्व मदत आणि पाठिंबा मिळणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हे फक्त देशातील महत्त्वाचेच नव्हे तर एक अद्वितीय राज्यसुद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राची मदत मिळालीच पाहिजे. केवळ महाराष्ट्रच नव्हे देशातील प्रत्येक राज्याला सद्यस्थितीत केंद्राची मदत मिळाली पाहिजे”, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून देखील राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी खुशाल हवे ते गौप्यस्फोट करावेत ! । शरद पवार

News Desk

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासात २८,७०१ नवे कोरोना रुग्ण

News Desk

‘पीसीपीएनडीटी’ अंतर्गत प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक; सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

Aprna