HW News Marathi
महाराष्ट्र

रेल्वे स्थानक सौंदर्यीकरणात महाराष्ट्र नंबर १

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्रातील दोन रेल्वे स्थानकांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. चंद्रपूर आणि बल्लारशाह या दोन स्थानकांना या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. बुधवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली आहे.

विदर्भातील प्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेच्या आधारे पेंटिग्ज, मूर्तींच्या कलाकृती तसंच भित्तीचित्रांचा वापर करत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दोन स्थानकांचे सौंदर्यीकरण केलेले आहे.

रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरण स्पर्धेत बिहारच्या मधुबनी स्थानकाला तसेच तामिळनाडूमधील मदुराई स्थानकाला दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. त्याचबरोबर गुजरातमधील गांधीधाम, राजस्थानमधील कोटा आणि तेंलगणामधील सिंकदराबाद स्थानकांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला १० लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ लाख रुपये तर तृतीय क्रमांकाला ३ लाख रुपये पुरस्काराच्या स्वरुपात देण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आंतरजातीय विवाह केल्यास जीवे मारण्याची धमकी, मुलीची आई-वडिलांविरोधात न्यायालयात धाव

News Desk

मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी, संधी मिळताच आडवं करावं !

News Desk

भाजप शक्तिप्रदर्शन स्वबळावरील सत्तेसाठी

News Desk
राजकारण

विधिमंडळातील राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी मला परवानगी द्या !

News Desk

मुंबई | विधीमंडळातील राजदंडाकडे जर केवळ शोभेची वस्तू म्हणून पाहण्यात येणार असेल तर मग हा मला मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब करण्याऐवजी कामकाज सुरूच ठेवण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र लिहून त्यांच्याकडे राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली.

मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळात मोठा गदारोळ झाला. यावेळी मुस्मील आमदाराकडून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे विधानसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. तसेच मुस्लिम आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद देखील भिरकावले. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणावरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे.

जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले ?

‘जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष विधीमंडळात असतात तेव्हाच हा राजदंड असतो. ते याचे एक प्रातिनिधीक सन्मानचिन्ह असते. त्यामुळे हा राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब व्हायला हवी होती. मात्र आज तसे न होता राजदंड उचलल्यावरही विधीमंडळाचे कामकाज सुरूच राहिले’, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related posts

15 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी कॉग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल

swarit

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

आमच्या उमेदवारांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच !

News Desk