HW News Marathi
Covid-19

राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, ‘ही’ आहे नवी तारीख 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले गेले आहे. त्याप्रमाणे, आता राज्याचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबर रोजी बोलवण्यात येईल, असा निर्णय आज (२८ जुलै) कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुंबईतील विधान भवनात याबाबतच बैठक झाली. खरंतर, अगदी सुरुवातीला राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेश २२ जून रोजी होणार होते. त्यानंतर, कोरोनाचा वाढत जाणारा प्रसार लक्षात घेता कोणताही धोका न पत्करता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलून येत्या ३ ऑगस्टला निश्चित करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले जात आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत जात असताना हे अधिवेशन घेणे तितकेसे सोयीस्कर नसल्याने कामकाज सल्लागार समितीकडून पुन्हा एकदा अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान मंत्री, आमदार, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनास्थितीत गर्दी टाळणे, अंतर राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, कोणताही धोका न पत्करता हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि राजेश टोपे इन अ‍ॅक्शन मोड, दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा करणार दौरा

News Desk

बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर..रोहित पवारांचा शेलारांना टोला !

News Desk

“आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका,” सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

News Desk