HW News Marathi
महाराष्ट्र

आमचे खत चांगले आहे, महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार !

मुंबई | “आमचे खत चांगले आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार,” असा विश्वास युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील नेते मंडळी सध्या पक्षांतर करत आहेत. शिवसेना-भाजप मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे होत असल्याचा आरोप यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केला होता. पवारांच्या या टीकेला आदित्या सडेतोड उत्तर दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (२८ जुलै) अंधेरी मरोळ येथील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ठाकरे यांनी “आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, त्यानंतर महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होईल असे आदित्य ठाकरे म्हणाले..”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

MIM आणि वंचितच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

News Desk

इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना RT-PCR टेस्ट करणे बंधनकारक

News Desk

रेमेडिसेव्हिर इंजेक्शनचा जळगावात मोठ्या प्रमाणात तुटवडा, लवकर पुरवठा करा – गिरीश महाजन  

News Desk