HW News Marathi
Covid-19

महाविकासआघाडी ५ जागांवर लढणार, विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार !

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकसाआघाडी आता पाच जागांवर विधानपरिषद निवडणूक लढवणार आहे. आणि विधानपरिषेदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराचे नाव मागे घेतल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिला.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकासआघाडीने प्रत्येक २ उमेदवार दिले आहे.तर भाजपने चार उमेदवारांची नावे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दिली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १० उमेदवारी झाल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होण्यावर प्रश्न चिन्ही उभे राहिले होते. महाविकाआघाडीत तेढ निर्णाम झाला होता. मात्र, पण काँग्रेसने त्यांचा एक उमेदवार मागे घेतल्यामुळे आता परिषदेची निवडणू बिनविरोध होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने दोन उमेवार जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेच्या मन वळवण्यासाठी महाविकासाघाडीची बैठक बोलवली असून यात बैठीत महाविकासआघडीचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तर शिवसेनेकडून शिवसेनेकडून संजय राऊत आणि ठाण्याचे पालमंत्री एकनाथ शिंदे नेते बैठकीला उपस्थित आहे.

विधानपरिषदेतील असे आहे संख्याबळ

विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, आणि शिवसेना १ अशा एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणू जिंकून येण्यासाठी २९ मते आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीला विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. महाविकासआघाडीने विश्वदर्शक ठरावा वेळी १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. मात्र, भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे एकून ११५ सदस्यांचा पाठिंबा आहेत. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची कमतरता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. तर विधानसभेत निवडून आलेल्या ५४ व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सहज जिंकून येतील. तर काँग्रेस ४४ सदस्या असून त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसनं १०० वर्षे सत्तेत न येण्याचं ठरविलं!; पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर घाणाघात

Aprna

पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग मार्केट १ जूनपासून सुरू होणार

News Desk

“आई म्हणायची, भांडी वाजवू नको दळभद्री येते; मोदी महाराजांनी देशाला ताटं वाजवायला लावली”

News Desk