HW News Marathi
महाराष्ट्र

जनतेचा विचार करुन शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील – महेश शिंदे

सातारा | रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लिहिलेल्या घटनेनुसार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, ही घटना काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बदलली, असे म्हणत रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्यांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातंय, असा आरोप कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. तसेच जनतेचा विचार करून शरद पवार रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं वक्तव्यही शिंदे यांनी केलं आहे.

महेश शिंदे म्हणाले, “शरद पवार यांच्याकडे रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद आहे, ठीक आहे. त्यांचा अनुभव देखील मोठा आहे. मात्र, पवारांनी वंशपरंपरेप्रमाणे हे पद पुढच्या पिढीला दिल्यास रयत शिक्षण संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. कारण, त्यांच्या पुढच्या पिढीला प्रश्नांची जाण नाही. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अशा लोकांना या संस्थेवर घेतल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच जनतेचा विचार करून शरद पवार रयतचे अध्यक्षपद सोडतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.


नोकरी लावण्यासाठी सर्रास ४० लाख मागितले जातात

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रयत शिक्षण संस्थेची घटना बदलली. त्यानंतर या संस्थेत राजकीय व्यक्तींचा प्रवेश झाला आणि आता संस्था त्यांच्याच ताब्यात गेली आहे. रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावण्यासाठी सर्रास ४० लाख रुपये मागितले जात असल्याचा आरोपही शिंदेंनी केला आहे. तसेच रयतची अनेक कामे केवळ ठराविक लोकांनाच दिली जातात. वर्षानुवर्षे पेंटिंगचे काम फक्त बारामतीच्या एकाच व्यक्तीला दिले जाते. सातारा जिल्ह्यात पेंटर नाहीत का, असा सवालही त्यांनी केला आहे.

उदयनराजे भोसले रयतच्या बॉडीवर नसल्याने महाराष्ट्राची खदखद

खासदार उदयनराजे भोसले यांना ‘रयत’च्या संचालक मंडळावर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. राजकीय बळाच्या जोरावर ही संस्था काही राजकारण्यांच्या ताब्यात गेली असून हे योग्य नाही. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राजघराण्यातील उदयनराजेंना रयतच्या संचालक मंडळावर घेण्यात यावं, अशी मागणीही शिंदेंनी केली आहे. तसेच पारिवारिक ९ जण रयत संस्थेमध्ये घेतली असून त्यांचे रयतसाठी योगदान काय आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजपच्या कामाची पोलखोल झाली पाहिजे’, राज ठाकरेंची मागणी

News Desk

खून प्रकरणात विश्वास नांगरे पाटील यांचीही चौकशी

News Desk

“आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा वेळकाढूपणा”, देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून घणाघात!

News Desk