HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांनी पुन्हा धरली घरची वाट!

मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार अशी धाकधूक सगळ्यांनाच लागली आहे. २०२० वर्षात सगळ्यांचीच आबाळ झाली मात्र मजूरांना जरा जास्तच त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी केवळ लॉकडाऊनचा इशारा दिला आणि तिथे मजूरांनी आत्ताच घराकडची वाट धरली आहे. अनेक मजुरांनी पुन्हा आपल्या गावची वाट धरली असून, घरी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे.

दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच यापूर्वीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगार पुन्हा घरची वाट धरू लागले आहेत.

प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ मध्य रेल्वेच्या CSMT, LTT, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. LTT टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या २० रेल्वेसेवा चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा या ठिकाणी जातात. यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’

News Desk

केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये, वेळप्रसंगी कर्ज काढून लसीकरण करावे-नाना पटोले

News Desk

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा एसटी सोडण्याचे आदेश

News Desk