HW News Marathi
महाराष्ट्र

हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे – शाहू महाराज छत्रपतींचा एल्गार

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज (१५ जून) कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीयांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानुसार हा मोर्चा निघत आहे. हे आंदोलन मूक असणार आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शाहु महाराजांच्या समाधीस्थळावरुन याची सुरुवात झाली आहे.

या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी आहे. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

हा आवाज मुंबईपर्यंत पोहचलाय, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती बोलताना म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमतानं हाताळण्यापेक्षा दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता. हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला आहे, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे, केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं.”

‘मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. मराठा आरक्षण विषय पुन्हा पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी’ अस परखड मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मत मांडलं. तसंच, ‘पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात छत्रपती शाहू यांनी आपली भूमिका मांडत मराठा समाजाला लवकरात लवकर आंदोलन मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

‘एकाच व्यक्तीने हे घडवून आणणे हे शक्य नाही. यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. राज्यातील 48 खासदारांनी दिल्लीत आवाज वाढवला पाहिजे. केंद्रात बहुमतात सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय मांडावा लागणार आहे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी. कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरूस्ती केली तर हा विषय लवकर सुटू शकतो’ असंही छत्रपती शाहू म्हणाले आहेत.

संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांचं निमंत्रण

राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचं कर्तव्य, सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम आपण बदलली नाही. केंद्र आणि राज्याच्या समनव्याची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे, राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे, मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायची, उद्या तुम्ही मुंबईलाला यावं, उद्या मुख्यमंत्री, अजितदादा भेटतील आहे, राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, हातात हात घालून चालायला हवं, संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे, संयमाला चर्चेची साथ देऊ, राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.

“पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन” – धैर्यशील माने

“आरक्षण कोणामुळे थांबलं? आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? असे प्रश्न समाजाला पडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन” अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे.

“न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे. एका बाजूला जनरेटा तयार होतोय, 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेचं अधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, राजेंनी संयमाने भूमिका घेतली आहे” असंही धैर्यशील माने म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्मनिर्भर करुया! – अजित पवार

Aprna

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी, पडळकरांची सरकारकडे मागणी

News Desk

राहुल गांधी, प्रशांत किशोरांचा रवांडाच्या सरकारने फोन टॅप केल्याचा नितीन राऊतांचा आरोप!

News Desk