HW News Marathi
महाराष्ट्र

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेस म्हाडाच जबाबदार- मुंडे

मुंबईच्या भेंडीबाजार भागातील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला बिल्डिंग कोसळण्याची दुर्घटना दूदैवी असून या घटनेस म्हाडा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. मुंडे यांनी तातडीने भेंडीबाजार येथील जाऊन दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करत जखमींची भेट घेतली. यावेळी आमदार किरण पावसकर, आमदार राहुल नार्वेकर, स्थानिक आमदार अमीन पटेल उपस्थित होते.

म्हाडाने एसबीयुटी ला पुनर्विकासाची जबाबदारी दिली असली तरी काम होते का नाही हे पाहण्याची अंतिम जबाबदारी म्हाडाचीच होती. त्यामुळे म्हाडा स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही. मुंबईतील धोकादायक इमारतीचा 25-25 वर्ष पुनर्विकास विकास होत नसल्याने भाडेकरू जागा सोडत नाही. निश्चित काळात पुनर्विकास करण्याचे धोरण ठरले पाहिजे अशी मागणीही मुंडे यांनी केले.

भाडेकरूंना इमारत परिसरातील भागातच संक्रमण शिबीरात घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत. शासनाने स्वतःच्या ड्रीम प्रोजेक्ट पेक्षा धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाकडे आणि नागरिकांच्या जीवाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रु तर जखमींना 2 लाखाची मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यमंत्री बच्चू कडूंची कबड्डीच्या मैदानात एंट्री

News Desk

देशमुख गेले, राठोड गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर, भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

News Desk

“पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर राजीनामा द्या”, सुप्रिया सुळे भडकल्या

News Desk
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Related posts

मध्य, पश्चिमसह हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

Gauri Tilekar

मुंबईकरांसाठी आजचा दिवस अपघाताचा ठरला

News Desk

मरोळ नाका परिसरातील इमारतील आग, दोन बालकांसह चार ठार

News Desk