HW News Marathi
महाराष्ट्र

“पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर राजीनामा द्या”, सुप्रिया सुळे भडकल्या

पुणे | आंबिल ओढ्यावरील घरांवर काल (२४ जून) पुणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. आज (२५ जून) पुण्यात बोलत होत्या. “पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

यंत्रणांचा वापर विरोधकांसाठी

सुप्रिया सुळे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या छापेमारीवरुनही भाष्य केलं. “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. पवरा साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र नवी नियमावली यांनी काढली आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे जाणून बुजून केलं जातं. एखादा मोठा पक्ष देशात एव्हढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

आमचं प्रगतीचं राजकारण आहे

आमचं राजकारण हे प्रगतीचं राजकारण आहे. आम्ही लोकांची सेवा करण्यात व्यस्थ आहोत. तिसरी लाट कधी येईल याची चर्चा होईल. आता 24 तास महाविकास आघाडी तिसरी लाट रोखण्यात, त्याच्या उपाय योजनांमध्ये व्यस्थ आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई काल करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे.

यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं. पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि पाडकाम सुरु आहे. सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले तरी राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असे स्थानिक नागरिक म्हणणं होतं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचे भान ठेवले तर बरे’, सेनेने अमित शहांना सुनावले

News Desk

आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात सरकारला धारेवर धरू ! चंद्रकांत पाटलांची ग्वाही

News Desk

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ED कडून जप्त

Aprna