HW News Marathi
Covid-19

परप्रांतीय कामगारांची पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात, प्रत्येक कामगाराची नोंद

मुंबई | लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद थर्मल तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येत आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड सह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास १५,५०० कामगार परत येत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परतून येणाऱ्या या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम काँरंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम काँरंटाईनसाठी पाठवण्यात येते. मुंबई मध्ये बेस्टमार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

“राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः ४ ते ५ हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात ११ ते ११.५० हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल”, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा

News Desk

ट्रम्प यांचा भारताला इशारा ,मदत करा नाहीतर ..

Arati More

“लस घेऊनही स्वतःला वाचवू शकले नाहीत,हे कसले डॉक्टर”, रामदेव यांचे अजून एक वादग्रस्त विधान

News Desk