HW News Marathi
महाराष्ट्र

मिलिंद एकबोटेला काळं फासण्याचा प्रयत्न

पुणे | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेना न्यायालयाबाहेर काळं फासण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एकबोटेच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

मिलिंद एकबोटेला बुधवारी अटक करण्यात आली होती तर, गुरुवारी न्यायालयात हजर केले. या वेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दाेन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद एेकून घेऊन एकबाेटेला १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. पोलिस कोठडी संपल्याने आज पुन्हा एकबोटेला न्यायालयात हजर करण्यात आले असता आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी वाढविण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Cyclone Tauktae : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ राज्यांतही चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा

News Desk

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही ! मनसेने शिवसेनेला डिवचले

News Desk

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास तुम्हांला माहितीये का ?

News Desk
देश / विदेश

महानायक अमिताभ बच्चन यांनी दिनेश कार्तिकची माफी मागितली

News Desk

कोलंबो | भारतीय क्रिकेट टीम ने कोलंबो येथे झालेल्या तिरंगी मालिकामध्ये विजय मिळावला होता. या विजया चा शिल्पकार कार्तिकवर बच्चन यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. तेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांनी दिनेश कार्तिकची ट्विटवर माफी मागितली. भारतीय टीम विजयी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करताना घाईगडबडीत त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली होती. ही चुकी अमिताभ बच्चन यांना कळताच त्यांनी पुन्हा ट्वीट करून जाहीर माफी मागितली.

“भारत जिंगला…! भारत तिरंगी मालिका जिंकला आहे. भारत विरोध बांगलादेश असा सामना होता. हा सामना दिनेश कार्तिक यांनी जबरदस्त फंलदाजी केली…शेवटच्या २ षटकात २४ धावाची गरज होती. भारतीय टीमला एका चेंडूत ५ धावाची गरज होती. तेव्हा त्यांनी षटकार मारत… त्यांनी भारतीय टीमला विजय मिळवून दिला..!”

  • अमिताभ बच्चन यांचे नंतरचे ट्वीट

चूक लक्ष्यात आल्यानंतर “२ षटकार २४ नव्हे तर ३४ धावांची गरज होती. असे लिहून दिनेश कार्तिक यांची जाहीर माफी मागितली.”

दिनेश कार्तिक यांनी अखेरच्या चेंडूत षटकार मारल्यामुळे कोलंबोतील तिरंगी मालिकेत भारताला विजय मिळाला होता. भारताला विजयासाठी पाच धावांची गरज होती. भारतीय क्रिकेट टीमला विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यावेळी कार्तिक यांनी षटकार मारुन भारतीय टीमला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिक यांनी आठ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकरासह नाबाद २८ धावाची विजयी खेळी खेळून भारतीय टीमला विजय मिळाला.

Related posts

कर्नल पुरोहितला सशर्त जामीन

News Desk

रमा देवी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी आझम खान यांनी लोकसभेत मागितली माफी

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

Aprna