HW News Marathi
Covid-19

इंदापूरकर विरोधकांची पतंग कधीच आकाशात उडू देणार नाहीत !

विजय शिंदे | पेरू खरेदी, पतंग,सुरपट्या खेळण्यावरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपाला मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आज (२९ जुलै) उत्तर दिले. “कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे तालुक्यातील अनेक गोरगरिबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता अशा स्थितीत मागील ४ महिन्यांपासून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील सामान्य मागासवर्गीय लोकांना स्वतः भेट देत गरीब कुटुंबांना जीवनोपयोगी अन्नधान्याचे वाटप केले मात्र ज्या जनतेच्या जोरावर विरोधकांनी २० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केले त्या जनतेच्या वैयक्तिक रित्या मागच्या महिन्यात १ रुपयाच्या वस्तूंचे वाटप केले नाही त्यामुळे विरोधकांना या विषयावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही”, असा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला.

मदत न करता टीका करणाऱ्या विरोधकांना जनता कधीच सूर सापडू देणार नाही !

“जनता तालुक्यात कोरोनाशी लढत असताना विरोधक मात्र आपली विधान परिषदेवर कशी वर्णी लागेल त्यासाठी दोन-तीन महिने मुंबई दिल्लीत भाजप नेत्यांकडे वारी करीत होते. त्यामुळे त्यांचे तालुक्यातील जनतेविषयी पुतना मावशी प्रमाणे निवडणुकीपुरते प्रेम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही”, असा आरोपही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला. “विरोधकांनी टीका न करता विश्रांती घ्यावी इंदापूर तालुक्यातील जनता त्यांची पतंग कधीच आकाशात उडू देणार नाही”, असा इशाराही दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.

“गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून जवळपास दहा हजार रक्ताच्या बॉटल संकलन करण्याचे काम सुरू केले ज्यांना रक्ताची आहे अश्या हजारो लोकांना त्याचा उपयोग झाला तालुक्याचे राज्यभर कौतुक झाले मात्र विरोधकांनी कर्तव्य समजून एका गावात देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची हिंमत दाखवली नाही. तालुक्यातील युवकांमध्ये उत्साह वाढावा यासाठी अंतर ठेवून सुरक्षित खेळलो तर काय चुकलं? परंतु मदत न करता टीका करणाऱ्या विरोधकांना तालुक्यातील जनता कधीच सूर सापडू देणार नाही”, असा आरोप मंत्री भरणे यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन नाही, ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची मोठी घोषणा

News Desk

देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी-प्रशासनाचा एकमताने निर्णय

News Desk

परप्रांतीयांना आपापल्या राज्यात जाण्याकरता नोडल अधिकाऱ्यांकडे फॉर्म भरुन द्यावा लागणार

News Desk