HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्य आज ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार?

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा हे दोघे आज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थान बाहेर हनुमान चालिसा पठाण करणार आहे. राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांच्या वांद्रे येथील कलानगर मातोश्री समोर आज (२३ एप्रिल) सकाळी ९ वाजता हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा त्यांनी काल (२२ एप्रिल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आम्ही पोलिसांना सहकार्य करणार असून कायदा सुव्यवस्थेचे पालन करणार आहोत, असे ही राणा दाम्पत्य पत्रकार परिषदेत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आणि कालपासून मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्री बाहेर उपस्थिती आहेत. यामुळे आज काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील संकट दूर होण्यासाठी आम्ही मातोश्री येथे हनुमान चालिसाचे पठण करणार होतो. शिवसेना हनुमान चालिसाला विरोध का?, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला. रवी राणा म्हणाले, “उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात संकट आले आहे. राज्यातील संकट दूर करण्यासाठी आम्ही मातोश्री येथे हनुमान चालिसाचे पठण करणार होतो. शिवसेना हनुमान चालिसाला ऐवढा विरोध का?, असा सवाल रावी राणा यांनी उपस्थित केला आहे. रावी राणा पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करणार असून कायदा सुव्यवस्थेचे पालन करणार आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नव्हे तर आम्हाला १०० वेळा हनुमान चालिसा वाटवण्यास परवानगी दिली असती. आमच्या कार्यकते मुंबईला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणार आहेत त्यांनी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्याचा नाही, असे आवाहन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.

बाळासाहेबांची शिवसेना असती तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिली असती. बाळासाहेबांनी शेतकरी आणि बेरोजगारांच्या हितासाठी हनुमान चालिसा वाचू दिली असती. उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे हे सर्व हिंदू पहात आहेत. आम्ही मुंबईला आलो हे माहीत नाही. आम्हाला आमरावतीत थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही मुंबईत पाय ठेवून दाखवा. मी तर पाय नाही, मी मुंबईत जिंवत उभा आहे. आम्हाला १०० धमक्या दिल्या तरी हनुमान चालिसा वाचणारच आहे, असेही रावी राणा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक राणा दाम्पत्यांना दिली,” फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Aprna

महाविकास आघाडीकडून फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश

News Desk

पार्थ पवारांनी आता केले गणेश मंडळांचे कौतुक!

News Desk