HW News Marathi
महाराष्ट्र

“गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक राणा दाम्पत्यांना दिली,” फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | “एखाद्या गुन्हेगारालापण अशी वागणूक दिली जात नाही, त्यापेक्षा ही वाईट वागणूक रवी राणा आणि नवनीत राणा यांना दिली, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. आमदार रवी राणा आणि त्यांची पत्न खासदार नवनीत राणा या दोघांना तब्बल १२ दिवसांनी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. यानंतर नवनीत राणांना स्पाँडिलायसिसचा आजार असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. परंतु, नवनीत राणा यांना आज (८ मे) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नवनीत राणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या प्रकारे नवनीत राणा आणि रवी राणा त्यांना वागणूक देण्यात आली. परंतु, त्यांना जी वागणूक त्यांना आली ती अत्यंत गंभीर आहे. म्हणजे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना ही जी वागणूक दिली जात नाही. तशा प्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली. या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्यात असे मला वाटते. कालच मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, १४ तारखेला इतरांचे मास्क काढणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “चांगले आहे, उतरविले पाहिजे.”

नवनीत राणा डिस्चार्ज मिळाल्यानंतर काय म्हणाल्या

लिलावती रुग्णालयातून नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. नवनीत राणा म्हटले, ” “मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जावून निवडणूक लढवावी. त्यानी कोणाताही मतदारसंघ निवडावा आणि तिथे मी त्यांच्याविरोधात उभी राहीन. नारी शक्ती काय आहे ते त्यांना दाखवून देईन. मग, तेव्हा आपण प्रामाणिकपणा आणि मेहनतीसमोर कोण निवडून येते ते कळेल. जर दम असेल तुम्ही तुमच्या पुरवजांच्या नावाने तुम्हाला आज मुख्यमंत्री पद मिळाले. पण, तुम्ही जनतेसमोर येवून तुम्ही लढवून दाखवा. तुमच्या समोर महिला दाकत कशी उभी राहते. हे मी त्यांना दाखवून देते. आणि येत्या काळात मी त्यांना चेतावणी देते की त्यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांच्यासमोर एक महिला निवडणूक लढवून दाखवते. महाराष्ट्रची जनता ज्या पद्धतीने राम आणि हनुमान चालिसाच्या नावावर त्यांनी माझ्यावर अत्याचार केले आहेत. माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे उत्तर महाराष्ट्राची जनता देईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नाचता येईना अंगण वाकडं’, प्रवीण दरेकरांची अशोक चव्हाणांवर खोचक टीका

Jui Jadhav

किती दिवस मुस्कटदाबी आणि हुकूमशाही सहन करणार !

News Desk

उल्हासनगरात पुन्हा पोलिसांवर हल्ला, संतापाचे वातावरण

swarit