HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगावास ?

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांच्या जामीन अर्जावर आज (४ मे) सुनावणी होणार आहे. सध्या राणा दाम्पत्यांवर राजद्रोह गुन्हा अंतर्गत मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर २ मो रोजी निकाल लिहून पूर्ण न झाल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने आज निकाल राखून ठेवला होता. सध्या रवी राणा यांच्या १७ तर नवनीत राणा यांच्या ७ गुन्हे दाखल झाले आहे. आता राणा दाम्पत्याना जामीन मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

सध्या नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणा तळोजा कारागृहात ठेवले आहे. आता राणा दाम्पत्याच्या सुनावणीत न्यायालया काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसा त्यांना नाट्यानंतर पोलिसांनी २३ एप्रिल अटक केले होते. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने काल (२४ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी २३ एप्रिलला रोजी हनुमान चालिसा पठाण करण्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यानी अमरावती पोलिसांनी हुलकावणी देऊन एक दिवस आधी मुंबई दाखल झाले होते. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मातोश्री समोर ठिय्या आंदोलन केले. तर काही शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार मधील घरासमोर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आणि राणा दाम्पत्याना त्यांच्या घरात थांबविले. दरम्यान, राणा दाम्पत्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौ-याचे पाश्वभूमीवर कारण सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानी जावून हनुमान चालिसा पठाण करण्याचा निर्णय मागे घेतला व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला. यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याना राजद्रोहाच्या गुन्हा अंतर्गत अटक केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताच्या अवनी लेखराकडून आणखी नेमबाजीत रौप्यपदक!

News Desk

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता !

Arati More

कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान! – दादाजी भुसे

Aprna