HW News Marathi
देश / विदेश

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही पाहिला नाही इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी लावला !

मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (६ फेब्रुवारी) मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधात देशभर पेटलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आणि केंद्राच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. “शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही असा बंदोबस्त पाहिला नाही जितका शेतकऱ्यांसाठी लावला आहे”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “कृषी कायदे चूकीचे नाहीत. मात्र, त्यात काही त्रुटी आहेत. यासाठी प्रत्येक राज्यातील कृषीमंत्र्यांशी चर्चा होणे महत्त्वाचे होते”, असेही यावेळी राज ठाकरे यांनी बोलून दाखवले.
देशभर गेल्या २ महिन्यांहूनही अधिक काळ पेटलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जसा बंदोबस्त शेतकाऱ्यांसाठी लावण्यात आला तसा बंदोबस्त चीन-पाकिस्तानच्या सीमेवर देखील नाही. एवढ्या बंदोबस्ताची गरज काय ? सरकारचे कृषी कायदे पूर्णतः चुकीचे नाहीत. मात्र त्यात त्रुटी असू शकतात. याबाबत प्रत्येक राज्याच्या कृषीमंत्र्यांशी चर्चा होणे आणि उपाय काढणे महत्त्वाचे आहे. हे प्रकरण इतके चिघळण्याची काहीच गरज नव्हती”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता मी एकदम ठणठणीत”, डिस्चार्जनंतर गांगुलीची चाहत्यांना साद

News Desk

Chennai Water Crisis : चेन्नईसारखं पाणीसंकट मुंबईवर येणार ?

News Desk

Dongri Building Collapsed : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सहवेदना

News Desk