HW News Marathi
देश / विदेश

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधात देशात गेल्या २ महिन्यांहूनही अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, एकीकडे संसदेत हा मुद्दा गाजत असतानाच आज (६ फेब्रुवारी) शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली होती. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वळगून देशभर आज शेतकऱ्यांचा चक्काजाम सुरू होता. या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला राज्यातील महाविकासआघाडी सरकारने देखील पाठिंबा दिला होता. भाजप आमदार आशिष शेलार यांनी या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, “देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने ‘पॉप डान्स’ केला. तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात”, असे म्हणत आशिष शेलारांनी शिवसेना-काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात कि, “वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला. त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर ‘ट्रॅक्टर’ फिरवणार का?”, असे म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणी पक्षकारांनी युक्तिवाद १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावा | सर्वोच्च न्यायालय

News Desk

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची कुरघोडी कायम, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

News Desk

इंग्रजीत खासदारकीची शपथ घेऊन उदयनराजेंकडून “जय भवानी जय शिवाजी”ची घोषणा

News Desk