HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत. राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई, नाशिक, ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. पण, यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे पहिल्यांदाच ग्रामीण भागातील राजकारणात आपली ताकद आजमावत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने मनसेनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज ठाकरेंच्या ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष वेगाने तयारीला लागले आहेत.

पुणे जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनसेच्या पॅनेलतर्फे उमेदवार मैदानात असतील. त्यातच राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तालुकास्तरावर बैठका, मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत. तर राज ठाकरे २३ तारखेनंतर स्वत: पुणे जिल्ह्यात मेळावा घेणार आहेत. त्यामूळे मनसेला या निवडणुकीत यश मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या !

swarit

“बाळासाहेब थोर आहेत, मग त्यांच्याच संपत्तीची चौकशीची मागणी का केली? ” दीपक केसरकारांचा नारायण राणेंना सवाल

News Desk

“ना डरुंगी ना झुकुंगी”, मुंबईत येण्याआधी कंगनाचे ट्विट

News Desk