HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे नेत्यांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; आंदोलकांना बुलढाण्यातून बाहेर काढण्यास सुरुवात

मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar) यांच्यासंदर्भात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आणि आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी (MNS) महाराष्ट्रातून शेगावच्या दिशेने रवाना झाले होते. मनसे कार्यकर्ते राहुल गांधीची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी बुलढाण्याच्या चिखलीत दाखल झाले होते. परंतु, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना चिखलीच्या नाक्यावर त्यांचा ताफा रोखला. परंतु,  मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करत राहुल गांधीविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. तेव्हा पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, दिलीप बापू धोत्रे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी मनसे नेत्यांना चिखलीतून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, “लोकशाहीची दडपशाही झाली असून काँग्रेस कुटुंबीय घाबरले घाबरल्यामुळे पोलिसांनामध्ये आणले. काँग्रेस का घाबरली आहे आणि कोणत्या गोष्टीला राहुल गांधी घाबरले आहेत?, जोपर्यंत पोलीस आम्हाला शेगावला जाण्याची परवानगी देत नाहीत किंवा त्यांना काय आदेश देण्यात आले आहे. हे पोलीस आम्हाला दाखवत नाहीत. तोपर्यंत मनसे येथे ठिय्या आंदोलन सुरूच करणार होते. मनसेचा शेवटचा कार्यकर्ता येथे असेपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकार आणि समता परिषदेच्या विधिज्ञांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

Aprna

डिनो मोरिया हा BMC चा सचिन वाझे, सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील!

News Desk

शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, आमदारांनी व्यक्त केली नाराजी

News Desk