HW News Marathi
महाराष्ट्र

“त्यांना राज ठाकरेंची भीती वाटली पाहिजे”, मनसे नेत्याचा सरकारला इशारा

मुंबई | ठाण्यात महापालिकेच्या महिला कामगारावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकारावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. . दरम्यान, आज(३१ ऑगस्ट) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. दरम्यान, त्यांनी काळजी घ्या, फेरीवाल्यांचं काय ते बघू, असे म्हटले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.

त्यांना राज ठाकरे साहेबांची नक्की भीती वाटली पाहिजे

बाळा नांदगावकर म्हणाले, “अशाप्रकारे फेरीवाले वागत असतील आणि एका अधिकाऱ्यावर जिवघेणा हल्ला करत असतील. तर त्यांना भीती वाटली पाहिजे. ज्यांना शासनाची भीती वाटत नाही त्यांना राज ठाकरे साहेबांची नक्की भीती वाटली पाहिजे. झालेल्या घटनेवर सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. नाहीतर आम्ही कठोर होणारचं आहोत.”

काय आहे प्रकरण?

ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले.

न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे

तब्बेतीच विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरिवाला म्हणून फिरता येणार नाही ना त्या दिवशी यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. निषेध करुन ही लोक सुधरणारी नाहीयेत. आम्ही हे वारंवार सांगत होतो. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्याची बोट छाटली जातात? आज पकडले गेलेत उद्या जामीन होईल आणि परत हे बाहेर दुसऱ्यांची बोट तोडायला.

राज ठाकरेंचा फेरीवाल्यांना इशारा

ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला होता. “ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत.” असं राज ठाकरे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का!

News Desk

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 10 एप्रिल रोजी नांदेडमध्ये 

News Desk

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

News Desk