HW News Marathi
महाराष्ट्र

“निवडणुकीतील आमिषाला राजेश कदम बळी पडले असावेत” –  राजू पाटील

मुंबई | मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूरमधील अनेक पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच, आज (२ फेब्रुवारी) राजू पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही भेटीला गेले आहेत. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बोलताना, “गेल्या काही दिवसांपासून राजेश कदम यांच्या फेसबुक वॉलवरील पोस्ट संशयास्पद वाटत होत्या. परंतु ते राज ठाकरेंना मानणारे कट्टर सहकारी होते. कदाचित आगामी निवडणुकीतील आमिषाला बळी पडून त्यांनी पक्ष सोडला असावा”, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

“दोनच दिवसांपूर्वी आम्ही राजेश कदम यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तरीही कदम पक्ष सोडून का गेले याचे कारण आपल्याला समजत नाहीये. मात्र कदाचित त्यांची काही तरी अपरिहार्यता असावी किंवा निवडणुकीतील आमिषाला ते बळी पडले असावेत. मात्र एखाद्या व्यक्तीने पक्ष सोडल्यास पक्ष काही थांबत नसतो, तो उभारी घेत असतो. आमचे चुकले असते तर आम्ही माफी मागितली असती. मात्र ते माफी मागत आहेत याचा अर्थ त्यांची काही तरी अपरिहार्यता असावी”. त्याही पलीकडे निवडणूक आली की साम दाम दंड भेद पद्धतीने आपल्या पदरात इतर पक्षातील लोकं घ्यायची हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप सेना युती तुटलेली असल्याने इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पायाखालची जमीन सरकली असावी आणि त्यातून आमची माणसे फोडली असावीत. परंतु आगामी काळात याचा काही फरक पडेल असे अजिबात वाटत नसल्याचेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत मनसे काय पावले उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

राम मंदिर वर्गणीतून बांधणार ? हा तर 2024 च्या निवडणुकीचा प्रचार !

News Desk

राज्य लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप केल्याने मुख्यमंत्री भडकले

News Desk