HW News Marathi
महाराष्ट्र

‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’, मनसेचे नवा अभिनव उपक्रम!

मुंबई | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपले आहेत. यंदाचा गणेशोत्सव हा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. अशातच मनसेने लोकांसाठी नवा उपक्रम आणला आहे. त्याबद्दल अधिक माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. या वर्षी अनेक बाबा या नव्याने केल्या जाणार आहेत. त्या कोणत्याही याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोनामूळे कारखान्यातून घरी गणपती कसा नेतां येईल हा प्रश्न उभा राहिला असेल, त्यासाठी मनसेने एक नवा अभिनव उपक्रम आणला आहे. या उपक्रमाचे नाव आहे ‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’. या उपक्रमाचा विचार इतकाच आहे. की गाड्या किंवा टॅक्सीची उपलब्धतेवर कमी असल्याकारणाने सर्व लोकांना माहिम ते प्रभादेवी या भागांत लोकांना कारखान्यातून गणेशमूर्ती त्यांच्या घरी नेऊन देणार आहोत. ज्यांना या गोष्टींची गरज आहे त्यांना नोंदणीचे क्रमांक लवकरच देण्यात येतील. आणि त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते बाप्पाची मुर्ती तुमच्या घरी आणुन देणार आहेत.

“गणेशोत्सव अवघ्या १२ दिवसांवर आला आहे. परंतु अनेक गोष्टी यावेळी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागणारे आहेत. यांचे कारण म्हणजे कोरोनावर पार्श्वभूमी. यावेळी उत्साह जरी अधिक असला तरी काळजी घ्यावी लागणार आहे. त्यातील प्रमुख गोष्ट म्हणजे यावेळी आपल्याला गर्दी टाळायचा आहे. आपण गणपती आणायलाही कारखाण्यामध्ये जातो तेव्हा कारखाण्यात गर्दी असते, रस्त्यावर गर्दी असते, मिरवणूक असतात. हा उत्साह स्वाभाविक आहे,मात्र यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडे बदल करावे लागणार आहे. ही गर्दी कशी टाळतां येईल तर घरातील एकाच व्यक्तीनं गणपती आणायला जावे”, अशी माहिती मनसे नेते नितिन सरदेसाई यांनी दिली आहे.

https://www.facebook.com/292907584104783/posts/3422515117810665/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी बीड जिल्ह्यात केली अतिवृष्टीची पाहणी!

News Desk

“मुख्यमंत्री दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”, विनायक मेटेंची टीका

News Desk

फडणवीसांच्या कार्यकाळातील फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा !

News Desk