HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्री दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”, विनायक मेटेंची टीका

पुणे | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यापासून याचे संपुर्ण राज्यात पडसाद उमटताना दिसत आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडूनही सरकारची कोंडी केली जात आहे. तर दुसरीकडे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीवरून विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पुण्यात आज (१२ जून) झालेल्या पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते.

“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र त्या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली किंवा मराठा समजाला काय मिळालं. मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत सांगितलं नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं,” असा सवाल शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

मेटे म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयाने रद्द करून, जवळपास महिना होऊन गेला, तरी देखील सरकार न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करू शकलेले नाही. यामधून सरकारची मानसिकता दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ५ जून रोजी बीड येथे भव्य मोर्चा काढला. या मोर्चात तरुण वर्गाचा राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष पाहण्यास मिळाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भेट घेतली. त्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाबद्दल नेमकी काय चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले नाही. तेथून हात हलवत आले असून, त्यांच्या मनात पाप आहे,” असं म्हणत विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आता पुढील काळात राज्यातील अनेक ठिकाणी बैठका, मोर्चे आयोजित करून सरकारला जाब विचारणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात १५ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्याचबरोबर मुंबईत दुचाकी मोर्चा काढणार आहे,” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. ५० टक्के आरक्षण शिथिल करावं अशी मागणीही यावेळी मोदींकडे करण्यात आली. दरम्यान, राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी काम करत आहे. केंद्राकडे या विषय गेल्याने यावर आता काही ठोस तोडगा निघेल का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पेट्रोलने गाठली शंभरी, सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

News Desk

एसटी आणि वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड !

News Desk

‘मुंबई विमानतळावरील फलकावर अदानी ग्रूपकडून स्पष्टीकरण’, म्हणाले…!

News Desk