HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना युतीत एवढी वर्ष सडली, आणि १२४ वर अडली !

मुंबई | विधासभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खरपूस समचार घेतला आहे. “शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी आरोळी ठोकली होती की आम्ही राजीनामा देऊ, आमची एवढी वर्ष सत्तेत सडली, आणि १२४वर अडली.” असा टोला राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला.

राज ठाकरे म्हणाले की,” नाराज शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यावेळी राजीनामा खिशात घेऊन फिरतो असे म्हटले, मात्र कधी राजीनामा दिला नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी नुसत्या थापा मारल्या, हया असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नक, असे आव्हान राज ठाकरे यांनी गोरेगावमध्ये काल (१० ऑक्टोबर) झालेल्या सभेतून जनतेला केले आहे,

आरेतील झाडे कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का?

आरेतील वृक्षतोडीवरुनहीमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली. आरेतील शेकडो झाडे कापली, न्यायालये देखील सरकारला साजेसे असे निर्णय देत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत मग ते आरेतील झाडांची कत्तल का थांबवू शकले नाही? सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करु या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. आरेतील झाडे कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? आम्हाला मूर्ख समजता का? असे राज ठाकरेंनी म्हटले.

सरकारशी संगनमत करून सर्वोच्च न्यायालायचे कसे काम चाले, असाल सवाल राज ठाकरेंनी उपस्थिती सर्वोच्चन न्ययालायच्या कामकाजावर ताशेरे ओडले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्री आरेतील झाडे तोडण्याचा निर्णय दिला. कारण, न्यायालयाला शनिवार आणि रविवारी सुट्टी असेत. हे घडण्यामागेच कारण म्हणजे या सर्वाना जाब विचारणार कोणीही नाही म्हणून या गोष्टी घडत असल्याचे ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत 

News Desk

राज्यात केलं तेच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये करणार संजय राऊत!

News Desk

लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली

News Desk