HW News Marathi
महाराष्ट्र

पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत! 

मुंबई | ‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धन ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील मंदिरे पुन्हा उघडण्यासाठी भाजप आणि वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ मनसेही मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

“पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामित्व सिद्ध करण्याची चढाओढ?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला आहे. दरम्यान, काल (३ सप्टेंबर)सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारला होता.

भाजपचे घंटानाद आंदोलन, वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात केलेला विठ्ठल मंदिर प्रवेश आणि एमआयएमच्या आंदोलनानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर उघडण्याची मागणी करताना दिसत आहे. याआधी जिम व्यावसायिक आणि वाढीव वीज बिलासाठी मनसेने आंदोलन छेडले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज दुपारी १ वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल

News Desk

राजभवनावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांची टळली भेट!

News Desk

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर

News Desk