HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईला पाणी पुरवणारं मोडक सागर तलाव भरलं!

मुंबई | मुंबई मध्ये सलग तीन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक नद्या ,धरणं भरून वाहत आहेत. मुंबईला पाणी पुरवणारा मोडकसागर धारण सुद्धा भरल्याची माहिती आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ५३.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे महत्त्वाच्या पाच तलावांपैकी ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलाव गुरुवारी रात्री ३.२४ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे.

तलावात झपाट्याने वाढ

मुंबईत सततच्या पावसामुळे तलावात पाणी भरलं आहे. ठाणे व नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील तानसा तलावही गुरुवारी पहाटे ५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला. या दोन्ही तलावातून मुंबई शहराला दररोज सुमारे ९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावातील पाणीसाठा ५३.८६ टक्के म्हणजे ७ लाख ७९ हजार ५७८ दशलक्ष लिटर्सवर पोहचला आहे.

कसारा घाटात दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली असून रेल वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झाले. अंबरनाथ ते लोणावळा आणि टिटवाळा ते इगतपुरी दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी नाशिक आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्‍यान, मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असून, पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार,उद्धव ठाकरेंचं आश्वासन !

News Desk

शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण, वाद पेटला !

News Desk

मराठी कलाकारांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा, आशिष शेलारांकडून सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना फोन!

News Desk