HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार,उद्धव ठाकरेंचं आश्वासन !

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा प्रशन गंभीर होत चालला आहे.त्या पार्श्वभूमिवर गुरूवार ( १७ जून ) ला राज्यसरकार,खासदार संभाजीराजे यांची बैठक पार पडली.या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत पुढच्या ८ दिवसांमध्ये राज्यसरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच समाजातील निवडक लोकांची एक समिती नेमून त्याच्या माध्यमातून अन्य मागण्या तातडीने सोडविण्याची ग्वाही मुख्यममंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे आणि सकल मराठा समाजाला दिली.

आंदोलन सुरूचं राहणार !

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की, “नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढची दिशा ठरवली जाईल. सरकारशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र, मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.”दरम्यान, ही महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर संभाजीराजेंप्रमाणेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निकालाबाबत राज्य सरकार येत्या आठवड्याभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोल्हापूरातून आंदोलनाची सुरूवात झाली

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने महाराष्ट्रावर मूक आंदोलन सुरू केले आहे.पहिले आंदोलन १६ जूनला कोल्हापुरात झाले.या आंदोलनावेळी अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते,त्यांनी संभाजीराजेंना सरकारशी चर्चा करा ,मुंबईला चला असे सांगितले.त्यानतंर राज्य सरकारने बैठकीचे निमंत्रण दिले आणि ही बैठक १७ जूनला पार पडली. त्यानुसार सह््याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, बहुजन प्रवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

Manasi Devkar

तरुणांना संमोहित करून कट्टरवादी बनविण्याचा सनातनचा कट – सीबीआय

Gauri Tilekar

“किती काळ विरोधी पक्षात बसणार?”, फडणवीसांनी हसत दिले उत्तर

News Desk