HW News Marathi
महाराष्ट्र

चीनला लढा देण्यासाठी आपल्याला ताकद वाढवावी लागणार – मोहन भागवत

नागपूर | राज्यातील आणि देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यावरुन चीनवर अनेक देशांनी आरोप केले आहे. चीनमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. चीनने अनेक राष्ट्रांसोबत वाद उकरून काढला आहे. भारताच्या सीमेवरही चीन सैन्याने दमदाटी केली आहे. पण, भारतानेही चीनला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे चीनला धक्का बसला आहे. भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवून दिली आहे, तर आपल्या नागरिकांनीही राष्ट्रीय भूमिका घेऊन चीनवर सामाजिक आणि आर्थिक बाजूने बहिष्कार घालून लढा दिला आहे. त्यामुळे चीनला एकाप्रकारे हा हादरा आहे. पण आपल्याला आणखी सतर्क राहावे लागणार आहे. चीनला लढा देण्यासाठी आपल्याला आता ताकद आणखी वाढवावी लागणार आहे, त्यामुळेच आपण चीनला लढा देऊ शकतो, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. विजयादशमीच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

कोरोनाच्याआधी आपल्या देशात घटनाक्रम हा गुंतागुंतीचा होता. कलम ३७० लागू झाले, सुप्रीम कोर्टाकडून राम मंदिराचा निर्णय याच वर्षी आला. राम मंदिराचा निर्णय हा ऐतिहासिक होता. सर्व समाजाने या निर्णयाचं स्वागत केले. त्यानंतर ५ ऑगस्टला मंदिर निर्माणाच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले. मंदिराचा भूमिपूजन सोहळाही पार पडला. हे अत्यंत समाधानकारक होते, असं मत भागवत यांनी व्यक्त केले आहे. ‘भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमधून अनेक लोकं भारतात घुसखोरी करत असता. त्या राष्ट्रांमध्ये त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारामुळे ती लोकं आपल्या राष्ट्रात येतात. म्हणून नागरिक संशोधन विधेयक मांडण्यात आले. पण राजकीय आकसाने काही लोकांनी याला विरोध केला. या विधेयकाविरोधात चुकीचे वातावरण निर्माण करण्यात आले. पण, यावर चर्चा सुरू असताना कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या परिस्थितीमुळे या सर्व वादांवर पडदा पडला’, असेही भागवत म्हणाले आहेत.

‘कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने काटेकोर नियम लागू केले आणि लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी सरकारकडूनच नियम हे शिथिल करण्यात आले आहे. माध्यमांनीही या परिस्थितीत कोरोनाबद्दल मोठ्या प्रमाणात ऊहापोह केला. त्यामुळे लोकं घाबरली पण जास्त सतर्क झाली. कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले. अन्नदानाचे वाटप करण्यात आले. जी लोकं अडचणीत आहे, त्यांची मदत केली. कोरोनाच्या काळात ज्या लोकं लोकांच्या मदतीसाठी धावून आली. त्यांचे अभिनंदन करण्यासारखे आहे. आणि जी लोकं लढा देता देता शहीद झाले, त्यांचे दु:ख हे मोठे आहे, असं म्हणत भागवत यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार”

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत लवकरच प्रदर्शित होणार…

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात !

News Desk