HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेत पेगॅसस प्रकरणावरून पुन्हा गोंधळ, मंत्र्यांच्या हातातून निवेदन खेचून फाडलं!

नवी दिल्ली | देशात सध्या पेगॅससचं प्रकरण गाजत आहे. या मुद्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये ठिणग्या उडत आहेत. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत बाजू मांडण्यास उभे राहिले. तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिलं नाही. वैष्णव सरकारची बाजू मांडत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार पुढे सरसावले आणि त्यांनी मंत्र्यांच्या् हातून पेपर खेचून घेतले आणि फाडून टाकला. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मंत्री अश्विनी वैष्णव यांना बोलताही आलं नाही. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

अधिवेशनात गोंधळ

पावसाळी अधिवेशनात विरोधक खूप गोंधळ घालताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री वैष्णव बोलायला उभे राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती वंकैय्या नायडू यांनी विरोधकांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना आपलं वक्तव्य सदनाच्या पटलावर ठेवण्याची विनंती केली. “खासदारांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही असंच दिसतंय.”, असं मत वंकैय्या नायडू यांनी मांडलं. गोंधळामुळे शून्यकाळ आणि प्रश्नकाळही चालू शकलेला नाही. “विरोधी पक्षातील काही जण, विशेषत: तृणमूल काँग्रेसचे खासदार उठले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा्या हातातून पेपर घेतला आणि तो फाडून टाकला. असं वागणं खरंच दुर्दैवी आहे.”, असं मत भाजपा राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी नोंदवलं आहे.

काय आहे पेगॅसस ?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाझ शरीफ यांना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा दणका

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक होणार नाही | सर्वोच्च न्यायालय

News Desk

पीएनबी घोटाळा नव्हे तर ‘या’ कारणासाठी मी देश सोडला !

News Desk