HW News Marathi
Covid-19

राज्यात आज 62 हजार 097 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्यातील सातत्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा धडकी भरवणारा आहे. राज्य सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. कोणत्याही क्षणी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. अशा स्थितीत आज (20 एप्रिल) आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात 62 हजार 097 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात राज्यात नवीन 54 हजार 224 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 32 लाख 13 हजार 464 रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात एकूण 6 लाख 83 हजार 856 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14% झाले आहे. ही कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊनचे कडक पाऊल उचलण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईच्या निधनानंतर ३ दिवसातच राजेश टोपे पुन्हा राज्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले

News Desk

ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, त्यासंदर्भात स्थानिक प्रशासन घेणार निर्णय

News Desk

एसटी महामंडळाने लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ!

News Desk