HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारची इच्छा नसल्यामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही! – प्रीतम मुंडे

बीड | राज्य सरकारची इच्छाच होत नाही म्हणून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, असा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकासआघाडी सरकारवर केला आहे. बीडमध्ये प्रीतम मुंडेंनी आज (२० मे) पत्रकार परिषद घेऊन  महाविकासआघाडी आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. प्रीतम मुंडे म्हणाल्या, “बीडमध्ये महिलांवर वाढता अत्याचार हा अत्यंत वाईट असून या सर्वाला पालक जबाबदार आहेत. परंतु, राजकारणासाठी बीड जिल्हा हा सुपीक आहे,” असे त्या म्हणाल्या.

प्रीतम मुंडे म्हणाले, “जिल्ह्यातील अदोगती सुरू असलेला कारभार आहे. ती लवकरात लवकर थांबली पाहिजे, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरवणार आहोत,” नाव न घेता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका  केली. “राज्य सरकारची इच्छाच होत नाही म्हणून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही. मध्य प्रेदश सरकारने आरक्षणासाठी आपली बाजू लावू धरली. आणि राज्यात हक्काचे राजकीय आरक्षण प्रस्तापित झाले पाहिजे,” असे ठाम मत असल्याचे ते म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये अस्वस्थता नाही, नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं!

News Desk

मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही !

News Desk

संदीप देशापंडेंनी ‘या’ घटनेवर दिले स्पष्टीकरण

Aprna