HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही !

मुंबई | वाटाघाडीत अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा शब्द दिली नव्हता, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केले आहे. यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले चित्र दिसून आले आहे. पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री पदावर राहणार, मुख्यमंत्र्यांच्या धक्कादायक विधानानंतर शिवसनेनेचे खासदार संजय राऊत संताप व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही,” अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली. या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतील असे देखील राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितेल.

“सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असा शब्द मुख्यमंत्री स्वतः दिला होता.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ५०-५० फॉर्म्युला ठरला असल्याचा सांगतानाचा व्हिडिओ दाखवून राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्यां विधानांची आठवण करून दिली. लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच १८ फेब्रुवारी २०१९ रोजी युतीची घोषणा करतानाचा हा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ आहे.

आमची समजूत काढण्याची गरज नाही, आम्ही हट्टाला पेटलेला नाही आहोत. मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही, अशी टीका राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केली. ‘सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असे मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत. याचा अर्थ समजून घ्यायचा, डिक्शनरीमधील व्याख्या अजून बदललेल्या नाहीत.’ असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरिता जन-सुविधा केंद्राची उभारणी करणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

भाजपाच्या विखारी प्रचाराला महाराष्ट्र काँग्रेसचे २ लाख ‘गांधीदूत’ चोख उत्तर देणार !  

News Desk

राज्यात कोरोनाचा एकही पोसिटीव्ह रुग्ण नाही | आरोग्यमंत्री

swarit