HW News Marathi
महाराष्ट्र

रेल्वे प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय, मुंबईची लोकल ट्रेन ३१ मार्चपर्यंत बंद

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईची लोकल सेवा ही अद्याप अत्यावश्यक सेवांसाठी सुरु ठेवणार होते. मात्र, मुंबईत आज कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही २६ झाल्यावर मुंबईतील लाईफलाईन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्क सेवांसाठीही लोकल धावणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पॅसेंजर, मेमू, डेमू या सगळ्या गाड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा होणारा संसर्ग टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई लोकल आज रात्री १२ वाजल्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद असणार आहे.

काय होता आधीचा लोकलबाबतीतचा निर्णय?

या निर्बंधानुसार, लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार होता. यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार होती. याबाबतची विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. मुंबईच्या लोकल ट्रेन मधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने हे कठोर पाऊल उचलण्याचे बोले जात आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्र जास्त असल्याकारणाने खबदारीचा उपाय म्हणून राज्या सरकारने यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आली होती. या बंद दरम्यान या चारही शहरातील अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार होती. इतर कार्यालये आणि कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरात पाणीच पाणी

News Desk

पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागा नदीत ड्रेनेजचं पाणी

News Desk

अजित पवारांना क्लीनचीट देणारे परमबीर सिंह यांनी स्वीकारला मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार..

Arati More