HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई लोकल सामान्यांसाठी पुन्हा थांबणार? 

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल अर्थात गुरुवारी तब्बल ६० हजारांच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकट्या मुंबईत रोज १० हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबई तसे उपनगरीय प्रवास सोपा आणि सोयिस्कर करणाऱ्या लोकलवर पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसा विचार राज्य सरकार करत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

कोरोना वाढतोय, लोकलवर लवकरच निर्णय

“राज्यात तसेच मुंबईत कोरोना संसर्ग वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेस लोकल सेवेला जे निर्बंध होते ते घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच विचार केला जाईल,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, विजय वडेट्टीवारा यांनी लोकल बंद किंवा नवे निर्बंध लागू करण्याबद्दल वरील सूचक वक्तव्य केल्यामुळे आता चाकरमाण्यांच्या प्रावासावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. तसेच लोकलवर नव्याने निर्बंध लागू केले तर ते कोणते असतील याबद्दलसुद्धा अनेक तर्क लावले जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा २०२० सारखीच परिस्थिती येणार का? सामान्य लोकांसाठी लोकल प्रवास पुन्हा बंद होणार का? अशी धाकधूक नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. सरकार यावर काय निर्णय देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जर ती वेळ आली तर विचार करू”,मनसे सोबतच्या युतीवर फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान..!

News Desk

अखेर वैशाली झनकर यांना एसीबीकडून अटक!

News Desk

“आव्हाडांना विस्मरणाचा रोग”, फडणवीसांचा पलटवार

News Desk