HW News Marathi
महाराष्ट्र

आम्हाला वाटलं २५ वर्ष आम्ही राहू पण खाडकन आपटलोच ना!

मुंबई | आज (८ एप्रिल) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. यावरुनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधालअसून विजय सत्याचाच होतो असं म्हटलं आहे. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकार लवकच पडेल असं सातत्याने म्हटले आहे. सरकार सत्तेत असताना काय करावे याचे उपदेशही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “गेली दीड वर्ष हम करे सो कायदा सुरु आहे. मी एक सामान्य माणूस आहे. मी हे कायम म्हणत असतो की, ऊतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. हे कालचक्र फिरत असतं. आम्हीही हे मान्य केलं पाहिजे की ५ वर्ष सत्तेत राहील्यावर २५ वर्ष राहू असं वाटलं होतं पण खाडकन गेलो आम्ही खाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आमचं वारंवार आवाहन आहे की, धडाधड देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेले निर्णय रद्द करताय, पण असं सरकार नाही चालवता येत”.

“सरकार मेरीटवर चालवायचं असतं. जुने जे चांगले निर्णय असतात ते तसेच ठेवायचे असतात. तर नवीन निर्णयात विरोधी पक्षाला सामिल करुन घ्यायचे असते. मात्र, विरोधी पक्षाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत सहभागी करुन घेतले नाही. कोरोनाच्या बाबतीत सहभागी करुन घेतले नाही. त्यामुळे चक्र आता फिरुन खाली आले आहे. आणि या सगळ्याचा अंत भीषण होणार आहे”, असा गंभीर इशाराही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृह विभागाच्या कामकाजावर मुख्यमंत्री नाराज; गृहमंत्री आणि शरद पवारांची बैठक

Aprna

रक्तदान केल्यावर लगेच साईबाबांचं दर्शन

News Desk

सुजय विखे-बाळासाहेब थोरात यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk