HW News Marathi
महाराष्ट्र

वांद्रे गर्दी प्रकरण, वांद्रे सत्र न्यायालयाकडून पत्रकार राहुल कुलकर्णींना जामीन

मुंबई | वांद्रे प्रकरणी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णींना वांद्रे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. राहुल कुलकर्णी यांना १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी (१४ एप्रिल) आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार, मजुरांची गर्दी जमा झाली होती. ही गर्दी राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांना काल (१५ एप्रिल) अटक करण्यात आली होती.

राहुल कुलकर्णी यांना आज (१६ एप्रिल) वांद्रे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. राहुल कुलकर्णी यांना न्यायालयाने १५ हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करत तो ३ मेपर्यंत केला. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचे वृत्त एबीपी माझाने १४ एप्रिलला सकाळी दाखवले होते. यावेळी राहुल कुलकर्णी यांनी दक्षिण मध्य रेल्वेने काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचे उल्लेख त्यांनी वार्तांकन करताना म्हटले होते. यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकात गर्दी झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

यावेळी पोलिसांनी वांद्रे रेल्वे स्थानकातील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परराज्यातील मजुरांना चिथावणी देऊन वांद्रे येथे गर्दी जमवल्याचा आरोप असलेला उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. विनय दुबे याला ऐरोली येथून ताब्यात घेतले असून नवघर पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती नवी मुंबई परिमंडळ -१ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधली का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला खडसावलं

News Desk

आघाडी सरकारच्या काळात सिडकोला जमीनी दिल्या | मुख्यमंत्री

News Desk

“हे पद जर मला मिळालं असतं तर आपण कोकणचा कायापालट केला असता” – दीपक केसरकर

News Desk