HW News Marathi
महाराष्ट्र

TIFR च्या अहवालानुसार शाळा, कार्यालये या तारखेपासून सुरु करु शकतात

मुंबई | राज्यात हळूहळू सर्व बाबी पुर्व पदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शाळा, कॉलेज, ट्रेन सुरु झाले नाही आहेत. मुंबईत शाळा आणि कार्यालये कधीपासून पूर्णपणे सुरु होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशात आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) मुंबई महापालिकेला असे सुचवले आहे की १ नोव्हेंबरपासून ऑफिसेस, लोकल आणि १ जानेवारी २०२१ पासून शाळा सुरु करु शकतात. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने शास्त्रीय मॉडेलवर काढलेली ही तारीख आहे.

गणितीय पद्धतीने शास्त्रीय मॉडेल तयार करत हा अहवाल बीएमसीला सादर केल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. जानेवारी २०२१ पासून शाळा सुरु व्हाव्यात, असे या मॉडेलनुसार सांगितले आहे. ‘स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर सायन्स’चे अधिष्ठाता संदीप जुनेजा, प्रल्हाद हर्ष आणि रामप्रसाद सप्तर्षी यांनी हा अहवाल तयार केला आहे. ‘हर्ड इम्युनिटी’चा विचार करता डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत झोपडपट्टी भागात राहणाऱ्या ७५ टक्के, तर इतर भागातील ५० टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या असतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र पुन्हा संसर्ग होऊ शकेल का या मुद्द्याकडे अहवालात कानाडोळा झाला आहे.

सप्टेंबरमध्ये मुंबई शहरातील कार्यालयातील उपस्थिती आणि वाहतूक व्यवस्था 30 टक्के क्षमतेसह सुरु होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये ही क्षमता 50 टक्क्यापर्यंत वाढवता येऊ शकते. तर एक नोव्हेंबरपासून संपूर्ण शहराचं जनजीवन पूर्ववत सुरु करता येऊ शकतं, असा अनुमान डॉ. जुनेजा यांनी मांडला. 16 सप्टेंबरलाच पूर्णपणे सर्व गोष्टी उघडल्यास दुसरी लाट येण्याची भीती अधिक आहे, असे यात म्हटले. सार्वजनिक वाहतूक सेवेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेलेच पाहिजेत. याशिवाय तोंडाला मास्क लावणे, हातांची स्वच्छता आणि ट्रेन्स तसेच कार्यालयांचे नियमित निर्जंतुकीकरण केलं गेलं पाहिजे, अशा सूचनाही या अहवालात करण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

News Desk

“प्रिय देवेंद्रजी तुम्ही हे कसं विसरू शकता की…”, राऊतांनी फडणवीसांना करून दिली ‘ती’ आठवण!

News Desk

मानधनवाढ होऊनही संप सुरु ठेवणे चुकीचे -मंत्री पंकजा मुंडे

News Desk