HW News Marathi
महाराष्ट्र

शाळकरी मुलांच्या पाण्यात बुडून मृत्यूच्या कारणावरून परत मुंडे बहीण-भावात जुंपली

बीड | नदीपात्रात अवैधरित्या केलेल्या वाळू उपशामुळे खड्ड्यात पडून गेवराई तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या संतापजनक घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करून तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे. या घटनेस सातत्याने दुर्लक्ष करणारे प्रशासनही तितकेच दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. नदीपात्रात अवैधरित्या खड्डे खोदून वाळूचा सर्रास उपसा चालू आहे. सत्ताधारी किंवा प्रशासन त्यांचेवर कसलीच कारवाई करत नसल्याने त्यांचे धारिष्टय वाढले आहे. वाळू माफियांनी खोदलेल्या नदीपात्रातील खड्डय़ात पडून गेवराई तालुक्यातील शहाजानपूर येथील चार शाळकरी मुलांचा नुकताच दुर्दैवी मृत्यु झाला, ही घटना अतिशय संतापजनक आहे, प्रशासन आणि वाळू माफिया अजून किती जणांचे बळी घेणार आहे ? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी प्रशासनाने मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे .

तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांना माध्यमांनी या घटने बाबत विचारणा केली असता धनंजय मुंडे म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात अश्या पद्धतीने 302 चा गुन्हा वाळूमाफीयावर दाखल केला गेला असेल तर त्याबद्धल सखोल चौकशी करावी लागेल. म्हणत पंकजा मुंडे यांचे नाव न घेता लगावला टोला. तर पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणले की, मुलांचा असा मृत्यू होणे खूप दुर्दैवी घटना आहे ज्या कारणामुळे मुलांचा मृत्यूव झाला आधी ते पाहणं गरजेचे आहे .वाळू उपसा वैद्य होता का अवैध होता हेही पाहावे लागेल तसेच वाळू उपसा वैध होता तर तितक्या खोल खड्डा करून वाळू उपसा करता येतो का?का खड्ड्यावरच 302 चा गुन्हा दाखल करायचा? म्हणत धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला तर पुढे बोलतांना म्हणले की, तहसील दार पासून ते जेसीबी वाल्या पर्यंत चौकशी झाली पाहिजे तसे आदेश मी कलेक्टर यांना दिलेत दोषींवर नक्कीच कार्यवाही करण्यात येईल असे धनंजय मुंडे म्हणले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

प्रताप सरनाईकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा,किरीट सौमय्यांसह भाजप नेत्यांचं ठिय्या आंदोलन !

News Desk

काँग्रेस पक्षाचं शिवसेनेत विलगीकरण झालयं का? निरूपमांचा काँग्रेसला सवाल

News Desk