HW News Marathi
महाराष्ट्र

गेली २०-२५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीची पालिकेत सत्ता आहे… सुप्रिया सुळेंच्या आरोपावर महापौरांची प्रतिक्रिया!

पुणे | राज्यात गेले २ दिवस पावसाची संततधार सुरु आहे. पुण्यात तर पावसाने लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अशात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात जी परिस्थिती उद्भवली त्याला पालिका जबाबदार आहे असे म्हटले आहे. आज त्या पुण्यात बोलत होत्या. पुण्यात पालिकेत भाजप असल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“काल पुण्यात जो पाऊस झाला तो कमी वेळात जास्त पाऊस पडला. जवळपास ९७ मिलिमीटर पाऊस पुण्यामध्ये पडला. गेल्यावर्षी जो पाऊस झाला त्यात आंबिलवाड्याला पुर आला होता. त्यात वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर तेव्हाच पाऊस एका दिवसात ७० मीमी झाला होता. त्याच्या तुलनेने कालच्या पाऊस अधिक झाला. यावेळी पालिकेने चांगले काम केले. परंतु नाल्याच्या आणि नदीच्या बाजूला जरी घरी आहेत त्यांत पाणी घुसले. महापालिका असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल या सगळ्यांनी काळजी घेतली आहे. अशात हवामानात जो बदल झाला आहे तो पश्चिम महाराष्ट्राला काल पावसाने झोडपले. त्यामुळे पुण्यात वेगळं काही झालं असं नाही”.

“मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी असे आरोप केले की यामागे महापालिकेचा भोंगळ कारभार आहे. पण मला असं वाटतं की, ताईंना माहित असेल की गेली २०-२५ वर्ष पालिकेत कॉंग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता आहे. आणि असं असताना केवळ ३ वर्षात अशी परिस्थिती भाजपच्या काळात आली असं म्हणता येणार नाही“.

ज्या भागाचा त्यांनी उल्लेख केला तिथे त्यांचेच महापौर होऊन गेले. त्यामूळे भाजपवर हे ढकलू नये अशी विनंती महापौरांनी सुप्रिया सुळेंना केली आहे. कारण २०-२५ वर्षांपुर्वी दुरदृष्टी त्यांनी ठेवली असता तर आज अशी स्थिती उद्भवली नसती असा टोलाही महापौरांना लगावला आहे. त्यामूळे नागरिकांवर हवामान खात्याने दिलेल्या गोष्टी पाळत सतर्क राहावे असेही आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयकुमार गोरे हटावण्याची माण- खटावमधील सर्वपक्षीयांची मागणी 

News Desk

राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चाललाय!

News Desk

“तर तो ‘शक्ती’ कायदा, काय चाटायचा आम्ही?”, पूजा आत्महत्या प्रकरणावरुन राणे बंधुनी सरकारला झापले

News Desk