HW News Marathi
महाराष्ट्र

अधिकार्‍यांनी कुणाची कठपुतळी होऊ नये, रश्मी शुक्ला प्रकरणावर कॉंग्रेसची प्रतिक्रिया  

मुंबई | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कामकाजाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. आता पुढे काय होतं ते बघा, असा सूचक इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावर सरकार कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाना पटोले आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पटोले यांनी हा सूचक इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा निषेधही नोंदवला. अधिकारी अधिकारी असतात. त्यांनी जनतेसाठी काम करावं की एखाद्या पक्षासाठी हे त्यांनी ठरवावं. अधिकार्‍यांनी कुणाची कठपुतळी होऊ नये, त्यांनी जनतेसाठी काम करावं, असं सांगतानाच काँग्रेसने अधिकार्‍यांचा कधीच असा वापर केला नाही, असं पटोले यांनी सांगितलं.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सादर केला अहवाल

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने या विषयावरचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांचे दावे, बदलीच्या प्रक्रिया आणि फोन टॅपिंग याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

सीताराम कुंटे यांनी या अहवालात म्हटलं आहे, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्यात येत आहे.”

रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० महिन्यात एक अहवाल त्यावेळी डीजी पदावर असणाऱ्या सुबोध जैस्वाल यांना पाठवला होता. यामध्ये बदल्यांच्या रॅकेटबद्दल महत्त्वाचा उल्लेख होता. त्यावेळी सीताराम कुंटे हे अतिरिक्त मुख्य सचिव होते. रश्मी शुक्ला यांनी त्यावेळी पाठवलेल्या अहवालावरून देवेंद्र फडणवीस यांनी विविध आरोप केले आणि पोलीस दलात बदल्याचं रॅकेट कसं चालतं ते समोर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा नवा अहवाल सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत! – वर्षा गायकवाड

Aprna

फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा शिवसेनेला रामराम!

News Desk

आदित्य ठाकरे ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार ?

News Desk