HW News Marathi
महाराष्ट्र

“पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था”, नाना पटोलेंचा इशारा

मुंबई | मंदिरं सुरु व्हावी म्हणून राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून अनेक टीका होत आहे. मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे.

सत्तेच्या बाहेर गेल्याने भाजप कासावीस

नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना भाजपवर शरसंधान साधलं. सत्तेच्या बाहेर गेल्याने भाजप कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो तशी भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते येनकेन प्रयत्न करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी तर 15 ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचं काही पडलेलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

भाजप मुस्लिम आणि हिंदू हा वाद सातत्याने करत आहे

ईदच्यावेळीही बंधनं आणली होती. बकरी ईदच्यावेळी मुस्लिमांमध्येही रोष निर्माण झाला होता. पण राज्य सरकार नरमले नाही. त्यांना प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचं आवाहन करण्यास सांगितलं होतं. तसं पत्रकही राज्य सरकारने काढलं होतं. हे माहीत नसेल तर त्याचीही एक कॉपी पाठवतो. पण भाजप मुस्लिम आणि हिंदू हा वाद सातत्याने करत आहे. मानवतेला कलंक लावण्याचं पाप भाजप सातत्याने करत आहे. ते त्यांनी बंद करावं, असं ते म्हणाले.

मंदिरं इतर राज्यात उघडली आहे का पाहा

मंदिर उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपने मंदिरे उघडी करण्यासाठी संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. मंदिरं इतर राज्यात उघडली आहे का पाहा. विशेषत: भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मंदिरं उघडली का ते पाहा आधी. हिंदुत्ववादी केद्रांतल सुद्धा सरकार आहे असं आम्ही मानतो. त्यांनाही चिंता आहे, पण तेच काळजी घ्या म्हणून सांगत आहेत, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२५ वर्षांनंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायली जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास!

News Desk

राष्ट्रवादीने केली ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्‍याची घोषणा

News Desk

‘अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली पाहिजे’ – चित्रा वाघ

News Desk