HW News Marathi
महाराष्ट्र

इमानी कोण करतंय हे देशातील लोकांना समजते, नाना पटोलेंची भाजपवर टीका

कल्याण | महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले विविध उद्घाटन निमित्त कल्याणमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर देशात सत्ता बदलेल असे चित्र निर्माण केलं जात आहे मात्र महाराष्ट्रातली सत्ता बदलणार नाही असा आमचा पूर्ण विश्वास आहे, असं नाना पटोले म्हणाले.

एल्गार परिषदेतील वक्तव्याबाबत बोलताना पटोले यांनी कुठल्याही धर्माबाबत कोणालाही टीका करण्याचा अधिकार नाही जे केले ते चुकीचे आहे. याबाबत आम्ही तक्रार केल्याचे स्पष्ट केलं आहे. तर शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटीच्या ट्विट बाबत बोलताना पटोले यांनी पुन्हा केंद्र सरकारला लक्ष केलं आहे. एक काळ असा होता की सेलिब्रिटींना भाई लोकांची भीती होती. आता सेलिब्रिटींनी ट्विट केले ते केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विट केल्याचा आरोप यावेळी केला आहे.

सिंधुदुर्गाच्या दौऱ्यात अमित शहा यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना २०१४ सालंच मोदींचं सरकार सहा चाकी होतं. आत्ता एक एक चाक कमी होत चालले आहेत. बेइमानी कोण करतंय हे देशातील लोकांना समजते. उद्धव ठाकरे यावर त्यांना उत्तर देतील अस सांगितलं आहे. इतकंच नाही तर, पुढे बोलताना मला खुर्चीचा मोह नाही,खुर्ची माझ्या मागे धावते मी खुर्चीच्या मागे धावत नाही. राज्यात काँग्रेसला एक नंबर वर आणून महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता समर्पित भावनेने अधिकारी व कर्मचारी काम करणार

Aprna

पंढरपूरची पोटनिवडणूक १७ एप्रिलला ! शरद पवार कोणाला उमेदवारी देणार ?

News Desk

“सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर हरवल्या, शोधणाऱ्यास ५०० रुपये बक्षिस देऊ” भूमाता ब्रिगेडचा स्टंट

News Desk