HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?”, फडणीसांना पटोले यांचा उलट प्रश्न

मुंबई | सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.इंधन दरवाढीवरून अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर पटोले यांनी निशाणा साधल्यानंतर त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्याला नाना पटोले यांनी उत्तर दिले.

पटोले पुढे म्हणाले की, एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का?… ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले?

पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रसरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी. लोकशाहीच्या मार्गाने जसं आधी मनमोहन सिंह सरकारच्या काळात त्यांनी भूमिका मांडली, तशीच आताही भूमिका मांडावी, जर त्यांनी भूमिका नाही मांडली तर त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘नाना पटोलेंचे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोलल्यावर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ’, असा टोला फडणवीसांनी नाना पटोलेंना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊसतोड कामगारांसाठी माजी पालकमंत्री पंकजा मुंडे झाल्या भावूक

News Desk

कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत!

News Desk

नारायण राणेंनी गुन्हेगारांना पाठिशी घालू नये; संजय राऊतांचा निशाणा

News Desk