HW News Marathi
महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर नारायण राणे म्हणाले……’

सिंधुदुर्ग। महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि नारायण राणेंमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दारामागे चर्चा झाली. या भेटीमुळे आता नवीन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागचं नेमकं कारण काय? याच्या विचारात सगळेच आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्वाद यात्रेचा आज(२९ ऑगस्ट) शेवटचा दिवस असून, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच्या भेटीईबद्दल विचारलं असता, नारायण राणेंनी त्यांचं मत सांगितलं आहे.

बंद दाराआड ही तुमची भाषा आहे

नारायण राणे यांना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबद्दल विचारलं असता, त्यांनी सांगितलं, ” “बंद दाराआड ही तुमची भाषा आहे. उगाच लावालावी करु नका. कोणी कोणाला भेटल्याने मला फरक पडत नाही. उलट मी जास्त सुरु झालो आहे. कुठेच थांबलो नाही आणि थांबणारही नाही. मवाळ होणं माझ्या राशीत नाही”.

आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा

“यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी झाली आणि अपशकून झाले. आता अग्रलेख वैगेरे येत आहेत. आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा. संजय राऊत यांनी आधी मालकाची मुलं काय करत आहेत हे पहावं. संजय राऊत आम्हाला बोलण्यासाठी, माहिती काढण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. संजय राऊतांमुळे शिवसेनेची अधोगती होत आहे. सामना आणि शिवसेनेची प्रतिमा लोकांमध्ये अजिबात चांगली नाही. समोरासमोर भेटलं की चांगलं बोलायचं आणि फोन आला की ये रे माझ्या मालका. माझ्या मुलांसोबत बरोबरी करु नका. दोघंही हुशार आणि शिकलेले आहेत,” असा इशारा नारायण राणेंनी यावेळी दिला आहे.

आता हे सर्व बस्स करा

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. मी शेवटी एवढेच म्हणेल की आता हे सर्व बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही तर मी पण प्रहारमधून सुरु करेल. कोण कुठे बसतो, काय करतो याचा गौप्यस्फोट करेल, असा इशारा राणे यांनी दिला. अनिल परब कितीही लपून काहीही करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेऱ्यावर आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

शिवसैनिकांनी रथयात्रा थांबवण्याचा प्लान होता

शिवसैनिकांनी रथयात्रा थांबवण्याचा प्लान होता. पण 12 ते 15 लोकच समोर दिसले. माझी गाडी आली तेव्हा शिवसैनिकांनी कलटी मारली. राणेंवर बोलल्याने पद मिळतात म्हणून सर्व सुरू झालं आहे. अशा लोकांनी गप्प रहावे. मला माझे काम करु द्या. काही लोक मला खिश्यात ओढायला पाहतात, माझ्या हातून काही चूक होईल पण असं होणार नाही. मी गप्पही बसणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजीनाम्या पेक्षा आत्मपरिक्षण करा-ना.धनंजय मुंडे

News Desk

पंचवटी एक्सप्रेसला गळती

News Desk

अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त

News Desk