HW News Marathi
महाराष्ट्र

“मी वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बांधले”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा सुरु आहे. यात्रेची सुरुवात त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला वंदन करून केली आहे. जनआशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे हे वसई-विरार शहराच्या दौऱ्यावर आहेत. तसेच, यावेळी त्यांनी, “मी घरात बसून काम करत नाही.” असा टोला देखील लगावला व आदित्य ठाकरे हे चिरंजीव मंत्री असल्याचेही ते म्हणाले आहेत.

“मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बनवले असून ते दलदलीत बांधले नाही”

नारायण राणे यांनी स्मारकाला वंदन केल्यावर त्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बनवले असून ते दलदलीत बांधले नाही.”; अशा शब्दात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जेवढी कामे मी केली आहेत, त्यापेक्षा एक दशांश कामे देखील उध्दव ठाकरे यांनी केलेली नसल्याचे ते म्हणाले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुध्दीकरण करून घेतले होते, त्याबद्दल त्यांनी पुन्हा शिवसैनिकांर निशाणा साधला. शुध्दीकरणाचे उद्योग करण्यापेक्षा उद्योग उभारून रोजगार निर्मिती करा, असे ते म्हणाले आहेत.

मी घरात बसून काम करत नाही

“मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी आणि दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे.”, असे राणेंनी यावेळी बोलून दाखवले. याचबरोबर, “मी घरात बसून काम करत नाही किंवा व्यासपीठावर डावी उजीवकडे बघून उत्तरे देत नाही. मी जेवढी कामे केली त्याच्या एक दशांश कामे देखील उध्दव ठाकरे यांनी केली नाही. ” असेही म्हणाले. तर, “नगरविकास मंत्री हे केवळ सही पुरते असून मातोश्रीच्या संमतीशिवाय एकाही फायलीवर सही होत नाही.” असा आरोपही यावेळी राणेंनी केला आहे.

दलदलीत ते स्मारक

नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले कि, “फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करा. मग कारभार करा”, असं ते म्हणाले आहेत.

मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं

शिवसेनेने नारायण राणेंना स्मारक जवळ न येऊ देण्याचा इशारा दिला होता. यावर देखील राणे यांनी टीका केली आहे. “राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे अपघात रोखण्यासाठी घेणार जपानची मदत

News Desk

राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळांने घेतली पोलिसांची भेट

Aprna

पंडित बिरजू महाराज निधन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली

News Desk