HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतींना अभिवादन!

मुंबई | राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून एकाच चर्चा रंगात होती, ती म्हणेज केंद्रीय मंत्री नारायण राणे बाळासाहेंच्या स्मृती स्मारकाला अभिवादन करणार का आहे नाही याचा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अखेरीस शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन केलं आहे. यावेळी राणेंंसोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.

महाराष्ठ्र उद्वस्त करायला निघालेल्या सांगू इच्छितो, तुमचा काळ संपला

नारायण राणेंनी मुंबईत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधून त्यांच्यावर टीका केली आहे. “महाराष्ठ्र उद्वस्त करायला निघालेल्या सांगू इच्छितो, तुमचा काळ संपला आहे. राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे:, असा दावा करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणलं. आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी जोमाने काम करावं लागेल, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.

“महाराष्ट्रातील सरकाराने गेल्या अडीज वर्षात कोणताही विकास केलेला नाही. उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत

राज्यसरकारच्या कामावरून नारायण राणे त्यांना नेहमीच सुनावत असतात. यावेळेस त्यांनी राज्यसरकारचे वाभाडे काढणार असल्याचं बोले आहेत. “महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत. 16 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांचं जे काही काम चालू आहे, राज्य ज्या पद्धतीने अधोगतीकडे नेहण्याचं काम करत आहेत. त्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील लोकांना जागृत करेन. त्यातच केंद्रामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या न्यायाबद्दलही माहिती देईन”, असं यावेळी राणे म्हणाले आहेत.

तसेच राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. चिपळूणसह कोकणमध्ये पुन्हा एकदा पाहणीसाठी जाणार आहे. मी कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर आमच्या मंत्र्यांनी 700 कोटी रुपयांची मदत केली. अन् मुख्यमंत्री गेल्यानंतर फक्त दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. लोकांनी ते पैसे पिंपात टाकले, उद्धव ठाकरे यांच्या नावाने ते फुगून बाहेर येतील, अशी खिल्ली राणे यांनी ठाकरे सरकारची उडवली आहे.

शुभेच्छा बॅनर हटवले

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज(१९ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. मात्र त्यांच्या एन्ट्री आधीच त्यांचे पोस्टर्स काढण्यात आले आहेत. शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन करतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे. मात्र या यात्रेवर पावसाचं सावट आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच मुंबई मनपाने माहिम , शिवाजी पार्क भागात नारायण राणे यांचे शुभेच्छा बॅनर हटवले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत, या भागातील बॅनर हटवले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसारा घाटातील पुलावर गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला

News Desk

मराठीचा अपमान होताना शिवसेना गप्प होती : अजित पवार

News Desk

शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड

News Desk