HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे दिल्लीला रवाना! नेमकं काय कारण?

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे तात्काळ दिल्लीला रवाना झाले आहेत. गोव्याहून दिल्लीला रवाना होणार आहेत त्यांना पक्षश्रेष्ठींनी तत्काळ दिल्लीत बोलविले असते, असे समजते. मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राणेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांनी महाडच्या गुन्हे शाखेमध्ये भेट देणे अपेक्षित होतं, पण ते दिल्लीला जाणार असल्यामुळे महाड गुन्हे शाखेत उपस्थित राहणार नाही, मात्र, नारायण राणे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र महाडच्या गुन्हे शाखेमध्ये पाठविले जाणार आहेत.

मनाई आदेशाचा भंग

मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्या सभा घेतल्याप्रकरणी सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ यांच्यासह एकूण १२ भाजप पदाधिकाऱ्यांवर बांदा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर सभा आयोजनासाठी मदत करणाऱ्या इतर २५ ते ३० जणांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बांदा पोलिसांनी दिली आहे.

अलिबाग पोलिसांत हजर राहणार का?

महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना सशर्त जामीन दिला होता. न्यायालयाने राणे यांना 30 ऑगस्ट रोजी अलिबाग पोलिसांत हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार नारायण राणे आज अलिबाग पोलिसांत हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद आणि चर्चा रंगली होती. याच्याच दुसऱ्या अंकाला आजपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, नारायण राणे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बोलवणं आल्यामळे राणे तात्काळ दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अलिबाग येथे नारायण राणे हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनातन संस्थेवर बंदी घाला | अबू आझमी

swarit

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk

मला पार्टीचं निमंत्रण होतं, पण…!, अस्लम शेख यांचा खुलासा

Gauri Tilekar