HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान!

जालना। गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठं विधान केलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून सूट देण्यात आलेली नाही, असं राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं. राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधात कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरणाची अट असणार आहे.

दोन डोस अनिवार्य करण्यात आले

सर्व निर्णय विचार करून घेण्यात आला आहे. शासनाच्या आदेशाचे जनहितासाठी तंतोतंत पालन करावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. तसेच चाकरमान्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान राज्यातील रात्रीच्या संचारबंदी विषयी केंद्राच्या सूचनेच्या निर्णयावर चर्चा आहे. याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. टास्क फोर्ससोबत चर्चा करून यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोरोना परिस्थिती

दरम्यान, महाराष्ट्रात काल 4 हजार 666 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले, तर 131 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 510 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या 3378, ठाण्यात 7283, तर पुण्यात 13 हजार 503 इतके सक्रिय रुग्ण आहेत.गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 909 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 380 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 763 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : जाणून घ्या…संचार बंदीमध्ये काय सुरू असणार, तर काय बंद

swarit

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

तर मी मुंबई कायमची सोडून जाईन,कंगणाचं गृहमंत्री अनिल देशमुखांना चॅलेंज

News Desk