HW News Marathi
महाराष्ट्र

उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही – नारायण राणे

मुंबई। चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली होती. मात्र, 18 तास होत नाही तोच राणे बॅकफूटवर गेले आहेत. उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्या आमच्याकडून होणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.नारायण राणे आज सपत्नीक चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. आम्ही कोणतंही राजकारण करणार नाही. राजकारण केलं जाणार नाही. उद्घाटनाला कोणतंही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू, असं राणे म्हणाले.

ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

जो समोर असतो त्याच्यावर प्रहार होत असतो

निमंत्रण पत्रिकेत राणेंचं नाव बारीक अक्षरात लिहिण्यात आलं आहे. त्यावरुन शिवसेनेने त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. माझ्याकडे सुक्ष्मच नाही तर लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद आहे. 80 टक्के उद्योग माझ्या हातात आहे. हे काही लोकांना कळत नाही, असं ते म्हणाले.शिवसेनेवर प्रहार करणार का? असा सवालही राणेंना विचारण्यात आला. त्यावर प्रहार करताना कोण सांगतं का? जो समोर असतो त्याच्यावर प्रहार होत असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत असेल तर मंत्रालय २४ तास चालू ठेवून दाखवा !

swarit

फसव्या सरकारचे ‘काउन्ट डाऊन’ सुरु

Adil

नांदगावच्या सेना आमदाराची भुजबळांशी खडाजंगी, त्यानंतर शिवसेनेची येवला मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा!

News Desk